श्रीमद आद्य श्री शंकराचार्य हे प्रत्यक्ष शंकराचे अवतार होते. त्या काळामध्ये सर्व ऋषीमुनी भगवान शंकराला अशी प्रार्थना केली, की आपण मनुष्य रूपाने या भूमीवर यावे. सांप्रत परिस्थितीत मनुष्याला मार्गदर्शन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ती आपल्याशिवाय कोणीही पार पाडू शकणार नाही. जर आपण गुरूरूपाने यांना घेतलात तर सर्वांना योग्य असे मार्गदर्शन होईल. भगवान शंकर आणि ती विनंती मान्य केली आणि सुमारे १२०० वर्षांपूर्वी भगवत् पूज्यपाद श्रीमद् आद्य श्रीशंकराचार्यांच्या रूपाने जन्म घेऊन वैदिक धर्माची पुन्हा स्थापना केली.
'सर्व विज्ञान मध्ये पारंगत झाले पाहिजे माझे आपण विशेष प्रकारे कार्य करू शकू' असे वाटले म्हणून ते गुरु शोधार्थ बाहेर पडले आणि नर्मदातीरी आले. येथील एका गुहेत त्यांना पूज्यपाद गोविंदाचार्य हे ध्यानमग्न असलेले दिसले. ते दिवस पावसाळ्याचे होते. नर्मदेचे पाणी क्षणाक्षणाला वाढत होते. गोविंदाचार्य जागृहेत ध्यान मग्न बसलेले होते त्या गुहेपर्यंत पाणी येऊन पोहोचले. वास्तविक पाहता गुरूंची भेट त्या वेळेला अजून झालेली नव्हती, पण आचार्यांनी विचार केला की पाणी जर आत मध्ये गेले तर आपल्या गुरूंना लागलेली समाधी एखादे वेळेला भंग होण्याची शक्यता आहे. तेव्हा आचार्यांनी आपल्या योग सामर्थ्याने ती नर्मदा आपल्या कमंडलूत ठेवली.
गोविंदाचार्यांनी समाधी उतरल्यावर विचारले, "अरे ही नर्मदा कोरडी कशी पडली?" तेव्हा आचार्यांनी सांगितले, "समाधी भंग होऊ नये म्हणून नर्मदा कमंडलुत भरली" तेव्हा गुरूंना इथे का आनंद झाला, की ज्या शिष्याला मी पाहिलं नाही त्याने मला पाहिलं नाही. तो शिष्य इतका कर्तव्यदक्ष असू शकतो का? त्यांनी शंकराचार्यांना विचारलं की 'आपण कोण आहात?' तेव्हा त्यांनी सांगितले " शिवोऽहं, शिवोऽहं!" आणि गोविंदाचार्यांनी त्यांना शिष्यत्व दिले. एवढे ज्ञानी पुरुष म्हणून जन्माला येऊन सुद्धा आचार्यांनी गुरु परंपरा सोडली नाही. गुरु सेवा करणे, गुरूंचा पादस्पर्श करणे, गुरूंचे दर्शन करणे ही आपली गुरुपरंपरा आहे.
गुरुंना असे शिष्य लाभले म्हणूनच आज पर्यंत ही गुरुपरंपरा टिकली आहे. परंतु शिष्य हा फक्त मंत्र जप करण्यासाठी असू नये, तर कर्तव्य पार पाडण्यासाठी असावा.
।। श्री गुरुदेव दत्त ।।