माता रामो मत्पिता रामचंन्द्र: ।
स्वामी रामो मत्सखा रामचंद्र: ।।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु ।
नान्यं जाने नैव जाने न जाने ॥
राम रक्षा हा जीवनात मोठा आधार आहे. श्री रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे. ही रामाची स्तुती आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की, प्रभू रामचंद्रांनी पुत्र, राजा, पिता, बंधु, पती या सर्व नात्यांची मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा स्तोत्र सांगितले आहे, त्यामुळे यातील प्रत्येक अक्षर मंत्रमय व तारक असे आहे. बुधकौशिक ऋषींनी ही वाणी जशीच्या तशी लिहून काढली, तीच ही रामरक्षा.
हात-पाय धुऊन किंवा शुचिर्भूत होऊन रामरक्षा स्तोत्र रोज म्हणण्याने बुद्धी आपोआप कुशाग्र होते. कितीही निर्बुद्ध व्यक्ती असो तिने याचे दररोज पठण केले तर वर्षानंतर नक्कीच प्रगती झालेली दिसेल.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे लहान असताना तेजस्वी नव्हते. त्यांची स्मरणशक्ती बेताचीच होती त्यांच्या घराशेजारी एका म्हातारीने राजेंद्रप्रसादांना रामरक्षेचा पाठ करावयास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी पाठ म्हणावयास सुरुवात केली. त्यांच्या स्मरणशक्तीत वाढ झाली. बुद्धी तीव्र व कुशाग्र झाली.
अत्यंत मनोभावे व एकाग्रचित्ताने जर रामरक्षाचे पाठ केले तर नऊ दिवसातच प्रचिती येते. नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते; ती आपले सदासर्वकाळ रक्षण करते. अबाल वृद्धांनी राम रक्षा नित्य म्हणावी; त्यापासून निश्चित फायदा आहेच. रामरक्षेचे आवर्तन करण्याची पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला एकदा द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीला नऊ वेळा रामरक्षा पाठ म्हणावा. जर भगवंताची स्तुती करता आली नाही तर या मुखाचा काहीच उपयोग नाही. नाना छंद, वाईट व्यसने ही रामरक्षा पठणाने कमी होतात. जीवनाची उन्नती फार झपाट्याने होते. जीवनावर फार मोठा परिणाम होतो.
जसा दात घासायला, केसांसाठी व इतर सर्व गोष्टींसाठी ब्रश आहे तसाच मेंदूसाठी रामरक्षा पठण हा एक ब्रश आहे.
।। श्री गुरुदेव दत्त ।।