आपली पात्रता काय आहे हे तपासुन घेण्यासाठी साधुपुरुषांच्या, सद्गुरुंच्या सहवासात राहण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःला सर्वज्ञ समाजत असते, परंतु प्रत्यक्षात तसे नसते. गुरुचरणाजवळ आल्यावर आपण कोठे आहोत, आपली पात्रता काय आहे हे फॅक्ट सद्गुरूच निर्भीड व स्पष्ट शब्दात सांगतील.
सद्गुरू चरणांची शक्य तेवढी सेवा करावी. त्यामुळे स्वतः मधील अहंकार कमी होतो. हि सांगत अतिशय उत्तम आहे; ती तुम्हाला नवजीवन प्राप्त करून देऊ शकते. स्वतः बद्दल केलेल्या चुकीच्या कल्पना नाहीशा होऊन सत्य परिस्थिती लक्षात येते, आपले दोष लक्षात येतात. आपल्या अंगी असलेले दोष बाहेर कसे काढणार? फक्त सत्पुरुषांच्या संगतीत गेल्यानेच ते दोष बाहेर काढणे शक्य होते. बाहेरून नवीन प्रवेश करणारे दोष बाहेर परस्पर हटविले जातात. लोखंडावर गंज चढला तर घासलेट लावून पुसावे लागते, तेव्हाच गंज निघतो, लोखंडावरील गंज तसाच पुसण्याचा प्रयत्न केला तर गंज निघत नाही, उलट लोखंडावरच पसरतो. लोखंडही साफ होणार नाही हे लक्षात घेऊन सद्गुरुंकडे जावे व स्वतःचे दोष नाहीसे करून घ्यावे.
सामान्य लोकांना सत्पुरुषांच्या दर्शनाला का जावे हे कळत नाही. ते आपल्या सांसारिक अडचणी सद्गुरूंसमोर मांडतात. वास्तविक पाहता जे पाहजे ते सत्पुरुष देऊ शकतात. इतका त्यांचा अधिकार मोठा असतो. मात्र प्रथम माणसाने स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. गुरुदेवांचे आशीर्वादच सर्व कामे करतात. फक्त माणसाने ते आशीवाद कसे मिळविता येतील ते पाहावे.
पाण्यात धुता धुता रोज कपड्यातील थोडी थोडी घाण निघते. काही काळानंतर कापड स्वच्छ निघतो. पाणी किती वापरले याचा विचार करू नये. आपल्या मनःपटलांवर नाना तऱ्हेच्या दोषांचे ढीग जमलेले आहेत. ते आपोआप निघणार नाहीत. त्यासाठी योग्य गुरु व योग्य मार्गदर्शन मिळेपर्यंत वाट पाहावी लागते. कितीही ग्रंथ वाचले, कितीही पुस्तके वाचले तरी वाचनाने योग्य ज्ञान प्राप्त होत नाही. स्वतःहून स्वतःला यातून मार्ग काढता येत नाही. त्यासाठी योग्य सत्पुरुषांचे, सद्गुरुंचे मार्गदर्शन व सहवास उपयोगी पडतो.
सत्पुरुषांच्या सहवासात मनाचा विकार कमी होतो. जसा जसा मनाचा विकार कमी होतो तशी तशी बुद्धीची प्रगल्भता वाढते.
।। श्री गुरुदेव दत्त ।।