"जो मला मनःपूर्वक शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवितो. जे माझ्याशिवाय कशाचीही भक्ती करीत नाहीत किंवा माझ्याशिवाय त्यांच्या मनात दुसरा कोणताही भाव नाही असे जे माझे भक्त आहेत त्यांची काळजी मी वाहतो." असे भगवंताचे वचन आहे. तुमच्या मनामध्ये तुमच्या गुरूंविषयी हाच अनन्य भाव जर असेल तर तुम्हा लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा हे भगवंताचं वचन निश्चित फलद्रूप होईल.
सद्गुरूंच्या सत्संगामध्ये बैठकीचा भाग आहे व बैठक हा भक्तीचा भाग आहे. असा जर विचार केला तर ती देवता त्या ठिकाणी अधिष्ठित असते असं माझं मत आहे आणि हे देवता जर त्या ठिकाणी अधिष्ठित असेल तर तुम्हा लोकांना सत्संगाची गोडी किंवा सत्संगाविषयी प्रेम गुरुभक्ती विषयी आवड निश्चितच निर्माण होईल असा मला विश्वास आहे. गुरु भक्ती करणाऱ्यांनी एक कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांची आपण भक्ती करीत आहोत ज्यांना आपण शरण जात आहोत तेच आपले त्राते आहेत.
यांच्या अंतःकरणात धुळा भक्ती नाही त्यांचे व्यक्तीवर प्रेम नसून वस्तूंवर प्रेम असते. रामरायांनी दिलेल्या आहारातील प्रत्येक मोती हनुमानाने फोडून पाहिला व त्यात राम नाही म्हणून फेकून दिला. हनुमानाच्या ठिकाणी रामाविषयी दृढभक्ती होती अनन्य भाव होता. प्रसंगी तो स्वतःचे देहभानही विसरत असे.
तुम्ही सर्व लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपण या सत्संगाला येऊन श्री गुरूंचे आशीर्वाद श्रवण करतो. आशीर्वाद श्रवण करीत असताना आपल्या अंधकारणात कशाकशा प्रकारच्या भावना येतात हे प्रत्येकाने जाणून घेतलं पाहिजे. तुम्ही लोकांनी दृढ भक्ती करावी. अनन्य भावाने भगवंताला शरण जावे म्हणजे भगवंता विषयी प्रेम निर्माण होईल आणि सत्संगाविषयी आवश्यक तो आदर वाटेल. सत्संगाच्या बैठकीला येऊन तुमची इच्छित मन:कामना पूर्ण होईल असा मला विश्वास आहे.
आपल्याला अन्यथा तर काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही. याचा तात्काळ अनुभव कोणाला येतो? ज्यांच्या मनामध्ये भक्ती विषयी विशेष उत्सुकता आहे त्यांना तुम्ही लोक सत्संगाला जमलात आणि दिलेले आशीर्वाद जर सर्वांना करीत राहिलात तर आपले गुरुदेव आपल्या सान्निध्य आहेत असा उत्कट भाव तुमच्या मनात उत्पन्न व्हायला हरकत नाही.
।। श्री गुरुदेव दत्त ।।