आपला धर्म मुळात मंत्र स्वरूपाचा आहे. मंत्रामध्ये महान शक्ती आहे. प्रत्येक मंत्रात वेगवेगळ्या देवतांचे सामर्थ्य साठविलेले असते. आपल्या भारतीयांचे कोणतेही धार्मिका कार्य असो, त्याचे मंत्र आहेतच, मंत्रांची संख्या हजारोंनी आहे. आपण घरी रोज देवपूजा करतो, नंतर मंत्र पुष्पांजली वाहतो. शत्रूचा पराभव, पैसा, पुत्रप्राप्ती, रोगराई निवारण, उत्तम आयुष्याचा लाभ, पर्जन्यवृष्टी, धनधान्य समृद्धी साठी आणि मृत्यू टाळणे अशा अनेक गोष्टींसाठी विशिष्ट मंत्र आहेत. जीव, ब्रम्हा व ब्रम्हांड यांचे ज्ञानही मंत्र्यांपासून होऊ शकते.
रुद्र, पवमान, गायत्री मंत्र व ऋग्वेदातील सर्व सुक्ते हे सर्वश्रेष्ठ मंत्र आहेत. मंत्रामध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी पण नपुसकलिंगी असे प्रकार आहेत. तसेच बीज मंत्र, मला मंत्र व मूलमंत्र अशा जाती आहेत, एकाक्षरी, पंचाक्षरी, एकादशाक्षरी, विसाक्षरी, एकविसाक्षरी असे त्यातील अक्षरसंख्यानुसार मंत्र आहेत. मंत्र निर्माण केले, त्याचे स्मरण स्थान म्हणजे त्यांचे हृदयच होय. हे मंत्र आहे हृदयाला जाऊन भिडतात. म्हणून मंत्रांना हृदयस्पर्शी असे म्हणतात.
जपानलेचे व मंत्राचे अविभाज्य नाते आहे. पुरश्चरण अनुष्ठान हेही असेच मंत्राशी संबंधित प्रकार आहेत. सूर्य हे परब्रम्ह आहे. सूर्याच्या भोवती सगळे ग्रह प्रदक्षिणा घालतात. त्यांचे ही प्रदक्षिणा 27 नक्षत्रांमधून होत असते. प्रत्येक नक्षत्रांचे चार पाद आहेत. माझे या नक्षत्रांच्या प्रदक्षिणा रुपी माळेचे 108 भाग होत असतात. म्हणून धर्मशास्त्राप्रमाणे जपमालेचे 108 मणी निश्चित केलेले असतात.
मंत्र हा नेहमी 'ॐ' पासून सुरू होणारा असतो तर नाम हे 'श्री' पासून सुरू होणारे असते. उदाहरणार्थ, ॐ नमः शिवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय व नाम म्हणजे श्रीराम, श्री गुरुदेव दत्त इ. नामस्मरण करताना एका जागी बसूनच केले पाहिजे असे नसते, परंतु मंत्र म्हणताना मात्र तो एका स्थानी बसूनच म्हटला पाहिजे.
मंत्रोच्चार करताना शुचिर्भुतता, पवित्र राखण्यात अत्यंत आवश्यक आहे. मंत्रोच्या करणाऱ्या ब्राह्मणाला अनेक प्रकारची बंधने पाळावी लागतात. चुकीचे उच्चारण करणे अथवा धर्मानुसार आचरण न करणारे ब्राह्मण जायजमानाच्या घरी पाठ करायला जातात त्यांनाही सुख मिळत नाही व अशा ब्राह्मणांनाही सुख मिळत नाही. अयोग्य वागण्याने व अशुद्ध मंत्रोच्चाराने दुष्ट शक्ती उत्पन्न होते व त्याचा त्रास होऊ शकतो.
।। श्री गुरुदेव दत्त ।।