सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या फिरण्याच्या निरनिराळ्या गतींमुळे ग्रहण होणार हे निश्चित. हे कोणीही थांबवू शकणार नाही. पृथ्वीवर ग्रह व नक्षत्रांचे व ग्रहांचे परिणाम होत असतात. ज्याप्रमाणे दूर कोठे जरी पाऊस पडला तरी आपल्याला गार वारा येतोच ना! तसेच जरी भारतात ग्रहण दिसणार नसले तरी पृथ्वीवर कुठेतरी दिसणारच. त्याचे परिणाम झाल्याशिवाय राहत नाही.
चंद्रग्रहणाचे परिणाम निसर्गावर, सृष्टीवर होतात. चंद्र प्रकाशामुळे वृक्षवल्लीतून रस निर्माण होत असतो. चंद्रप्रकाश हा चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर येऊ शकत नाही. त्यामुळे या रसनिर्मितीत दोष निर्माण होतो. काही रोगांचे जंतू चंद्रग्रहण काळात फार प्रभावी होतात व भराभर वाढतात.
सूर्यग्रहणाचे मानव जातीवर फार वाईट परिणाम होतात. या पृथ्वीवर अनेक जातींचे दृश्य व अदृश्य असे जीवजंतू निर्माण होत असतात. प्रकार सूर्यप्रकाशामुळे त्यावर नियंत्रण ठेवले जाते. ग्रहणाच्या वेळी सृष्टीमध्ये अशा वाईट जीव जंतूंच्या निर्मितीचे प्रमाण जास्त असते. ग्रहणाच्या वेळी सृष्टी मलुल बनते; टवटवीतपणा वाटत नाही. मनुष्य ही उदास होऊन जातो. इतर काळात आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात आनंद का वाटतो? याचे कारण वनस्पतींच्या टवटवीत पानांना स्पर्श करून वारा आपल्याकडे येतो; तेव्हा फार बरे वाटते; उत्साह व आनंद वाटतो. म्हणून लोक नेहमी खुल्या हवेत व निसर्गरम्य जागेत फिरायला जातात.
ग्रहणकाळात मन व शरीर शुद्ध ठेवावे. या काळात काहीही खाऊ पिऊ नये. या काळात अनिष्ट जीवन जंतू पोटात जाण्याचे प्रमाण जास्त असते. गरोदर स्त्रियांनी तर ग्रहण काळात विशेष काळजी घ्यावी. पोटातील पिंडाला केव्हाही भूक लागते. तरीही अशा वेळेस थोडी बंधने पाडून ग्रहणकाळ संपल्यावरच खावे. ग्रहण काळात देवांची शक्ती कमी असून दैत्यांची शक्ती प्रभावी असते. त्यामुळे पुढे होणाऱ्या संततीला मानसिक विकृती होऊ शकते.
ग्रहणकाळात अथवा ग्रहण सुटल्यावर समुद्रात अथवा तीर्थक्षेत्री स्नान करावे. ग्रहणकाळात दानधर्माचे महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान व वस्तुमान यथाशक्ती करावे. ग्रहण काळात तुम्हाला इतर काही जमले नाही तर ईश्वराचे नाव घ्यावे, चिंतन करावे म्हणजे अनिष्ट गोष्टी पासून त्रास होणार नाही.
।। श्री गुरुदेव दत्त ।।