रुद्राक्ष एका झाडाचे फळ आहे. रुद्राक्ष सर्व जाती, जमाती, स्त्री पुरुष, मुले धारण करू शकतात. रुद्राक्षाची माला १०८ रुद्राक्षांची असते. २७ मण्यांची ही माला गळ्यात घालतात. रुद्राक्षाला मुखे असतात. मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरच्या भोकापासून खालपर्यंत गेलेली सरळ रेषा. रुद्राक्षावर काटे असतात. रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितक्या मुखी तो रुद्राक्ष आहे असे समजतात. सध्या मिळणारे रुद्राक्ष हे एक ते चौदा मुखांचे असतात. १, ३, ५, ९ व १३ मुखांचे रुद्राक्ष उत्तम समजले जातात. रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंग सारखा आकार असतो. तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय. दोन रुद्राक्ष एकमेकाला जोडलेले असतात, त्याला शिवपार्वती समजले जाते. यांच्याकडे शिवाजी पिंडी नसेल त्यांनी रुद्राक्षावर अभिषेक केला तर तो शिवापर्यंत पोहोचतो.
रुद्राक्ष आम्ल, उष्ण वीर्य व वायू कफ नाशक आहे. ज्यांना रक्तदाबाचा त्रास असेल त्यांनी गौरीशंकर रुद्राक्ष जरूर वापरावे. तांब्याच्या तांब्यात रूद्राक्ष ठेवून ते पाणी सकाळी उठल्यावर प्यायले असता रक्तदाब नियंत्रित राहतो. असा गौरीशंकर रुद्राक्ष सोमवारपासून घालावा. स्नानाचे वेळी तो पाण्यापासून दूर ठेवावा असे शास्त्र आहे. रुद्राक्षाची माळ गळ्यात घातली असं का जर अभद्र पदार्थ खाण्यात आले तर त्याचे पाणी होते व ते शरीराला बाधत नाही. तसेच रुद्राक्ष गळ्यात घातल्याने उत्तम रक्ताभिसरण होऊन हृदयाला रक्ताचा चांगला पुरवठा होतो. ज्यांचे प्रकृती थंड आहे त्यांनी रुद्राक्ष अवश्य वापरावा. जेवढा रुद्राक्ष मोठा तेवढा त्याचा परिणाम जास्त होतो.
मृत्यू समय ज्यांच्या गळ्यात रुद्राक्ष असतो त्यांना पुढील जन्मात सदगती मिळते म्हणजे उच्च कुळात जन्म मिळतो. मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहात मोती सुवर्ण व रुद्राक्ष घालण्याची पद्धत आहे. त्यामुळे वाईट शक्ती त्या देहात प्रवेश करीत नाही. रुद्राक्ष अधिकारी पुरुषांकडून मिळणे फार्म भाग्याचे असते. तो गळ्यात घातला तर मनामध्ये सात्विकता निर्माण होते व मनुष्य अध्यात्माकडे आकर्षिला जातो.
।। श्री गुरुदेव दत्त ।।